शोधा

महाराष्ट्र

गोसेखुर्दवरून मुख्यमंत्री सतर्क

विदर्भातील महत्त्वाकांक्षी गोसेखुर्द सिंचन प्रकल्पग्रस्तांना ११९९ कोटी रुपयांचे पॅकेज देणार असाल, तर आम्हालाही असेच पॅकेज द्या, असा आवाज राज्यात सुरू असलेल्या इतर प्रकल्पांच्या बाधितांमधून पुढे येऊ शकतो, या शब्दात जलसंपदा खा…

चंद्रपूर झाले ‘सूर्य’पूर!

उन्हाने विदर्भात लोकांच्या डोळ्यांपुढे चांदणे नाचविले आहे. चंद्रपूरने आज देशात सर्वाधिक ४८.२ …

राज्यात चीन करणार गुंतवणूक!

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्याच्या मागास भागात चिनी कंपन्यांना असलेल्या गुंतवणुकीच्या संधींबाबत कल्पना दि…

मान्सून ५ ते १0 जूनपर्यंत राज्यात

नैर्ऋत्य मान्सूनने आज अर्धा बंगालचा उपसागर व पूर्ण अंदमान-निकोबार बेट व्यापले. मॉन्सूनला पुढे वाटचाल क…

ताज्या बातम्या

  • दूध महागले.. लोकमत - ४ तास पूर्वी
    दूध महागले..

    शासकीय दूध योजनेमार्फत विक्री करण्यात येणार्‍या दुधाचे दर वाढविण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने आज घेतला. त्यानुसार म्हशीचे दूध लिटरमागे ३ रुपयांनी तर गायीचे दूध लिटरमागे २ रुपयांनी महागले आहे.

  • ठरले की या कानाचे त्या कानाला कळत नाही - गृहमंत्री

    गुप्तता पाळायची तर पोलीस दल या कानाचे त्या कानाला कळू न देता काम करत असते, अशी प्रतिक्रिया गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी संजय दत्तला गुपचुप येरवडा कारागृहात हलविण्याबद्दल व्यक्त केली.

  • संजय गांधी निराधार योजनेत भ्रष्टाचाराचा आरोप झालेले राष्ट्रवादीचे नेते व वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्यावर खटला चालविण्यास संमती न देण्याची शिफारस राज्यपालांना करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज घेण्यात आला. आता राज्यपाल काय निर्णय घेतात, याबाबत उत्सुकता आहे.

  • मालेगाव येथे २00६ मध्ये झालेला बॉम्बस्फोट ‘सिमी’ या मुस्लिम संघटनेच्या सदस्यांनी केला असल्याचा महाराष्ट्र एटीएसचा दावा खोडून काढत राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) आज हिंदू संघटनांशी संबंधित असलेल्या चौघांविरूद्ध या बॉम्बस्फोटाचे आरोपपत्र दाखल केले.

  • पेट्रोल दरात अचानक वाढ लोकमत - ४ तास पूर्वी
    पेट्रोल दरात अचानक वाढ

    केंद्राकडून मिळणारे आयात शुल्क तफावतीचा निधी न मिळाल्यामुळे राज्यातील पेट्रोल कंपन्यांनी बुधवार मध्यरात्रीपासून पेट्रोलच्या दरात वाढ केली.

  • दोन महिन्यांपूर्वीच शंकरनगर चौकात झालेल्या बिल्डरच्या खुनानंतर आज सकाळी १0.२0 च्या सुमारास दोन पल्सरस्वारांनी जरीपटका भागात दीपक निहालचंद गुप्ता (४२)या बिल्डरवर गोळ्या झाडून त्याची हत्या करण्याचा प्रयत्न केला. जरीपटक्यातील कडबी चौकानजीक ही खळबळजनक घटना घडली.

  • देहदानाला लालफितीचा फटका लोकमत - ६ तास पूर्वी

    मृत्यूनंतर देहदानाचा संकल्प करणार्‍या व्यक्तीचे प्रेत नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी तत्परतेने पोहचविले. मात्र मृत्यू प्रमाणपत्र नसल्याचे सांगून मृतदेह स्वीकारण्यास नकार मिळाला.

  • डीड ऑफ कन्व्हेअन्स झाले नाही तर आपला राहता फ्लॅट हा कधीही आपल्या मालकीचा होणार नाही, उद्या सोसायटीने इमारतीची पुनर्बांधणी करण्याचे ठरवले तर ते अधिकार देखील फ्लॅट मालकांना उरणार नाहीत, बिल्डरच त्या जागेचे मालक असतील!

  • नागपूर विभागातील महत्त्वाकांक्षी गोसेखुर्द प्रकल्पाच्या बाधितांच्या पुनर्वसनासाठी ११९९ कोटी ६0 लाख रुपयांच्या पॅकेजला बुधवारी मान्यता देताना इतरही प्रकल्पांना हाच न्याय लावण्याची मागणी राज्य मंत्रिमंडळाने फेटाळून लावली.

  • शहरातील पीर दरवाजाजवळ शॉर्टसर्कीट होऊन लागलेल्या भीषण आगीत ट्रकसह आठ दुकाने जळून खाक झाली. आगीत ४0 लाखांचे नुकसान झाले. ही भीषण आग २२ मे रोजी पहाटे अडीच ते तीन वाजेच्या सुमारास घडली. सुदैवाने जीवीत हानी झाली नाही.

  • थिंकटॅन्कला विरोधाची गळती लोकमत - ६ तास पूर्वी

    सार्वजनिक धोरण संस्था उभारून त्याद्वारे शासनाचे थिंक टँक करण्याचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आला खरा पण त्याला विरोधामुळे गळती लागली. त्यामुळे प्रस्ताव बारगळला. राज्य मंत्रिमंडळाच्या अधिकारांवर या संस्थेमुळे गदा येईल, असा पवित्रा बहुतेक मंत्र्यांनी घेतला.

  • पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्यांचे अधिकार आता पोलीस महासंचालकांकडे सोपवण्यात आले आहेत, असे गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी आज स्पष्ट केले. हा प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी प्रसंगी कायद्यात बदल करण्यात येईल, असेही त्यांनी पत्रकारांना सांगितले.

  • बायकोचा भाऊ बनून त्याने तिचे लग्न गुजरातच्या तरूणाशी लावून दिले.आणि नवीन वरासोबत जाण्यासाठी रेल्वेस्टेशनवर येताच तिने फळ काढण्याचा प्रयत्न केला. ‘नवर’देवाचा संशयी स्वभाव इथे कामी आला आणि एका लग्नाची दुसरी गोष्ट जगापुढे आली. अजिंठा येथून सुरू झालेल्या या रंगतदार घटनेचा समारोप जळगावात टोळी ‘चतुभरूज’होण्यात झाला.

  • मराठवाडा होरपळला ! लोकमत - ७ तास पूर्वी

    मराठवाड्यातील अडीच लाख एकरवरील फळबागांना दुष्काळाच्या वणव्याचा फटका बसला असून ३0 वर्षांचा हिशोब करता १५00 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे उघड झाले आहे.

आणखी ताज्या बातम्या »