
लोकमत - रवि, ३ फेब्रुवारी २०१३महाराष्ट्रात पुन्हा एकदा पाणीटंचाईची भीषण परिस्थिती पर्यायाने दुष्काळाचे सावट निर्माण झालेले आहे.
दरवर्षी महाराष्ट्रात निर्माण होणार्या या परिस्थितीचे डोळसपणाने अवलोकन करण्याची
आणि त्यादृष्टीने काही ठोस उपाययोजना करण्याची गरज निर्माण झालेली आहे.
पाण्याच्या दुर्भिक्ष्याचा विचार करताना आणि त्यावर उपाययोजनांची चर्चा करताना
एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे, जलव्यवस्थापनासाठी सक्षम मनुष्यबळाच्या अभावाची.
त्यादिशेने खरोखर आपण हा मनुष्यबळाचा दुष्काळ तरी रोखू शकू?..
याविषयी भूशास्त्राच्या एका अभ्यासकाने शास्त्रीय दृष्टिकोनातून केलेले हे विश्लेषण..
एकविसाच्या शतकात युद्धे होतील ती पाण्याच्या प्रश्नावर’ हे विसाव्या शतकाच्या उंबरठय़ावर वर्तविलेले भाकीत प्रत्यक्षात येत आहे. उन्हाळ्याच्या वाढत्या दाहकतेबरोबर किंवा दुष्काळाची चाहूल लागताच शेताचे बांध, गावांच्या, तालुक्यांच्या, जिल्ह्यांच्या आणि प्रांताच्या सीमा धगधगू लागल्या आहेत. या धगीची ऊब मतांमध्ये परिवर्तित करण्यासाठी राजकीय पक्ष सरसावत आहेत. यातून धगीचे रूपांतर वणव्यात होणार. त्यांना धरणे, मोर्चे, दगडफेक, गोळीबार आणि त्यातून निर्माण झालेली परिस्थिती प्रसिद्धिमाध्यमांना विषय पुरवले जाणार. या गदारोळात उन्हाळी महिने पुढे सरकत जाणार, आकाशात ढग जमू लागणार आणि वळवाच्या सरींबरोबरच मॉन्सून सक्रिय होणार. पाण्याची उपलब्धता वाढू लागताच दुष्काळाची दाहकता भौगोलिक परिस्थितीप्रमाणे काही ठिकाणी कमी, तर काही ठिकाणी नाहीशी होणार. त्याचबरोबर, जलसंपत्तीचे नियोजन आदि विषय सरकारी फायलीत लुप्त होणार. जलसंपत्तीचे शाश्वत (sustainable) नियोजन, पाणलोट क्षेत्रविकास, कायमस्वरूपी उपाययोजना, सर्वंकष धोरण इत्यादी आश्वासक शब्द दैनंदिन जीवनात अनुभवता न आल्यामुळे बोथट झालेले शब्द जनताही विसरणार!
दुष्काळाची कारणमीमांसा :
महाराष्ट्राला दुष्काळ नवा नाही. नव्हे, तो पाचवीलाच पुजला आहे. १८८३च्या दुष्काळात महात्मा फुलेंना ‘पाणी अडवा-आणि जिरवा’ अशी घोषणा द्यावी लागली होती. त्यानंतर तब्बल शंभर वर्षांनी १९८३च्या दुष्काळातही तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादांना हीच घोषणा करावी लागली. यंदाही तेच आणि उद्याही हेच चित्र असणार आहे. कारण, वाढती लोकसंख्या आणि बदलती जीवनशैली, कारखानदारी, विद्युतनिर्मिती, शेती या सर्वांमुळे पाण्याची मागणी वाढतच जाणार आणि वाढत्या मागणीबरोबर संघर्ष धारदार होऊ लागणार, यात शंकाच नाही.
पाणलोट क्षेत्रातील विविधता :
महाराष्ट्रातील जलसंपत्तीचा विचार करताना पश्चिमेकडील कोकणातील समुद्रकिनार्यालगतच्या … आणखी »दुष्काळ