सातारा

ताज्या बातम्या

  • परळी : ‘मी फौजदार गोविंदराव आहे,’ असे सांगून एका माथेफिरूने परळी परिसरात आज सुमारे दोन तास धिंगाणा घातला. एका जीपच्या काचा त्याने फोडल्या, तर अनेक दुचाकीस्वारांना त्रस दिला. एका वयोवृद्धाला धक्काबुक्कीही केली.

  • सातारा : येथील विलासपूरमध्ये वृध्देला धमकावून घरातून सुमारे साडेपाच लाख रुपयांचा ऐवज चोरणा:या दोघांना सातारा शहर पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणातील अन्य दोघाजणांचा पोलीस शोध घेत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

  • सातारा : लोकमत तर्फे आयोजित केलेल्या वृत्तपत्र इतिहासातील पहिल्याच मास्टरशेफ स्पर्धेत फलटण तालुक्यातील जाधववाडीच्या रंजना धनसिंग माने या अव्वल ठरल्या. त्यांनी तयार केलेले नाचणीचे ढोकळे इतर पाककृतींच्या तुलनेत सरस ठरले. या विजयाद्वारे त्यांनी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी मजल मारली आहे.

  • बैलगाडी शर्यतीत धुमश्चक्री लोकमत - सोम, २० मे २०१३

    रहिमतपूर : वाठार किरोली, ता. कोरेगाव येथे बैलगाडी शर्यतीत गाडी का पळवली या कारणावरुन दोन गटात मारामारी झाली असून त्यामध्ये एकजण जखमी झाला आहे.

  • लोणंद : येथील सोना अॅलाईज कंपनीतील कामगारांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही, याची खबरदारी कंपनी प्रशासनाने घ्यावी. त्याचबरोबर कंपनीला आवश्यक असणा:या कामगार भरतीमध्ये स्थानिक भुमिपुत्रंना प्राधान्य द्यावे. स्थानिक भुमिपुत्र आणि कामगारांच्या पाठीशी आपण उभे राहू, अशी ग्वाही खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली.

  • सातारा : सातारचे खासदार उदयनराजे भोसले यांनी फलटण, लोणंद, शिरवळ पट्टय़ात जाऊन थेट पालकमंत्री रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या साम्राज्यात आपली ताकद दाखविण्यास सुरुवात केली आहे. लोणंद येथील एका कंपनीतील व्यवस्थापन-कामगार संघर्षाचे निमित्त ठरले असले, तरी राजकीय निरीक्षक याकडे रामराजे-उदयनराजे संघर्षाची ठिणगी म्हणूनच पाहत आहेत.

  • पुण्यानजीक असणा:या शिंदेवाडी जकातनाक्यावर जबरदस्तीने वसुल होत असलेली ‘एस्कॉर्ट फी’ला रविवारी महाराष्ट्र राज्य ट्रक, टेम्पो, टँकर, बस वाहतूक महासंघाने विरोध करत बंद करण्यास भाग पाडली. वाहतूक महासंघाच्या पदाधिका:यांनी नाक्यावर दगड ठेऊन थोडावेळ वाहतूकही रोखली.

  • सातारा। दि. 17 (प्रतिनिधी)
    जिल्ह्यात दुष्काळ निवारणाचा एक भाग म्हणून आगामी काळात 2 हजार 6क् साखळी सिमेंट बंधारे बांधण्यात येणार आहेत. यामुळे नदीपात्र तसेच ओढय़ांमध्ये पाणी अडून राहणार आहे. दरम्यान, जिल्हय़ात जुने सिंमेट बंधारे शोधून त्यांचे पुनरुज्जीवित करण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात 492 सिमेंट बंधारे हाती घेतले आहेत.

  • कोयनानगर। दि. 13 (वार्ताहर)
    ‘कोयना प्रकल्पाला पन्नास पूर्ण झाली तरी येथील प्रकल्पग्रस्त नरकयातना सहन कराव्या लागत असून अजूनही 4क् टक्के पुनवर्सन बाकी आहे. सरकारने तातडीने कोयना प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न सोडवून त्यांचे विकसनशील पुनवर्सन न केल्यास 9 ऑगस्टला ‘क्रांतिदिनी’ कोयनेच्या शिवसागर जलाशयात ‘करेंगे या मरेंगे’चा निर्धार करून आंदोलन करणार आहे,’ असा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी कोयनानगर येथे दिला.

  • क:हाड। दि. 17 (प्रतिनिधी)
    शहर परिसरात चोरटय़ांचा धुडगूस सुरूच असून शुक्रवारी पहाटे शहराच्या मुख्य बाजारपेठेतील दुकानांना त्यांनी लक्ष्य बनविले. चोरटय़ांनी एकूण 5 दुकाने फोडली. एका दुकानातील 11 हजारांचे साहित्य लंपास करण्यात आले तर इतर चार दुकानांत ऐवज हाती न लागल्याने चोरटे पसार झाले.

  • फलटण। दि. 17 (प्रतिनिधी)
    ‘राज्यातील तीव्र दुष्काळी परिस्थितीत स्वत:च्या मतदार संघाचा, जिल्ह्याचा विचार न करता राज्यातील तीव्र दुष्काळी भागातील गावांना एक हजार टाक्या व बोर मारून देण्याचा रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचा उपक्रम माणुसकी जपणारा असून शासन दुष्काळ निवारण करीत असताना व्यक्ती, सामाजिक संस्था व लोक सहभागातून मदत झाल्यास दुष्काळाचे निवारण लवकर होणार आहे,’ प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. यावेळी त्यांनी मागेल त्या गावाला पाणी, रोजगार व …

  • काम केलं नाही तर टोलेच बसणार! लोकमत - शुक्र, १७ मे २०१३

    सातारा। दि. 16 (प्रतिनिधी)
    गेल्या दोन वर्षापासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत कासवगतीने सुरु असलेल्या सुधारित पाणी योजनेचे काम म्हणजे ‘भीक नको पण कुत्रं आवर’ असंच होऊन बसलंय. सुधारणोच्या नावाखाली शासकीय यंत्रणा ठेकेदारांना हाताशी धरुन कशा प्रकारे लोकांवर जुलूम करु शकते, याचंच हे ठसठशीत उदाहरण ठरु शकेल. मात्र, ठराविक पातळीर्पयत लोक तो सहन करतील. मात्र, एकदाची सोसण्याची क्षमता संपली की ते टोले द्यायलाच हात उगारतील, हे शासकीय यंत्रणोने लक्षात घ्यायला …

  • सातारा। दि. 16 (प्रतिनिधी)
    न्यायालयाच्या आवारातून पलायन केलेला आरोपी रेशम्या भोसलेच्या बंदोबस्तासाठी चक्क आज मुख्यालयातील बँड पथकातील कर्मचारी नेमण्यात आले होते. याच कर्मचा:यांच्या हातावर तुरी देऊन रेशम्याने त्यांचा खरोखरच ‘बँड’ वाजविला. रेशम्या हातातून निसटल्याने या कर्मचा:यांवर हतबल होण्याची वेळ आली आहे

  • सातारा। दि. 16 (प्रतिनिधी)
    सातारच्या गौरीशंकर एज्युकेशन सोसायटीच्या कला महाविद्यालयाचे प्राचार्य विजयकुमार रामचंद्र धुमाळ यांच्या चित्रंचे प्रदर्शन मुंबईतील प्रतिष्ठेच्या अशा ‘जहांगीर आर्ट गॅलरी’त भरविण्यात आले आहे. चौदा तारखेला सुरू झालेले हे प्रदर्शन वीस तारखेर्पयत सुरू राहणार आहे.

आणखी ताज्या बातम्या »